दाणे भरण्याच्या अवस्थेत भातशेतीची काळजी घेणे आवश्यक......
भातशेतीची काळजी घेणे आवश्यक
जिवाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्यताः शास्त्रज्ञांनी सुचवल्या उपायोजना
वाणगाव, ता. २३ (बातमीदार) : जिल्ह्यातील भातपीक सध्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, परंतु वातावरणाच्या बदलांमुळे भातशेतीवर किडी व रोगांची लागण होत आहे. रोगामुळे भाताचे उत्पादन लक्षणीय घटते. यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्हीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये, या उद्देशाने शेतकऱ्यांनी भातशेतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्याबाबत कीटक शास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाने यांनी उपाययोजना सुचवल्या आहेत.
असे करावे रोगाचे नियंत्रण
प्रमाणित, रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा.
पिकात पाणी दीर्घकाळ साचू देऊ नये.
योग्य अंतर ठेवून लागवड करावी (जास्त दाटी टाळावी).
खताचा अतिरेक टाळावा, संतुलित खत व्यवस्थापन करावे.
रोग शेतात दिसल्यास स्ट्रेप्टोसायक्लिन एक ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम /१० लिटर पाणी फवारणी करावी.
आवश्यकता भासल्यास १०-१२ दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्या.
रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत होत असल्याने पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्टेप्टोसायकलीन आणि कॉपर बुरशीनाशक वापरावे. बियाणे रोगमुक्त शेतातील वापरावे. संतुलित खत व्यवस्थापन, जैविक सूक्ष्मजीवांची बीजप्रक्रिया व रासायनिक फवारण्या प्रभावी ठरतात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी, एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे प्रभावी आहे. त्यात प्रतिबंधात्मक, रासायनिक आणि जैविक उपाययोजनांचा एकत्रित वापर केला जातो.
- डॉ. उत्तम सहाणे, पीक संरक्षण शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.