निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासात
निरंकारी बाल संत समागम हर्षोल्हासात
बाल्यावस्थेत सुसंस्कारावर भर देण्याची गरज
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन, भिवंडी येथे रविवारी डोंबिवली झोनचा क्षेत्रस्तरीय निरंकारी बाल संत समागम भक्तिमय आणि हर्षोल्हासपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या समागमामध्ये बालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदोर येथून विशेष निमंत्रित केलेल्या निरंकारी ब्रह्मज्ञान प्रचारक रमेश वस्त्रकर यांनी प्रमुख भाषण केले. त्यांनी सांगितले की, संस्कार जीवनाचा पाया असतो आणि बाल्यावस्थेत मिळालेले चांगले संस्कार आयुष्य सुखी करतात. बाल संत समागमाद्वारे विश्वाला एक नवीन दिशा मिळते आणि संपूर्ण जगात शांती स्थापन होण्यास सद्गुरूंच्या ब्रह्मज्ञानाचा आधार असतो. त्यांनी म्हटले की, बाल्यावस्थेत ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यास अनोख्या प्रकारचा अनुभव मिळतो.
कार्यक्रम डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, वाशिंद, शहापूर, कसारा, भिवंडी, मुरबाड अशा विविध भागांतील निरंकारी बालक आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बालकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये गीत, कविता, विचार आणि नाटिका सादर करून संत निरंकारी मिशनचा संदेश दिला. कार्यक्रमाचे मंच संचालनही बालकांनी केले. याशिवाय बालकांच्या मनातील आध्यात्मिक विचार आणि संस्कार प्रदर्शित करणारी बाल प्रदर्शनीही लावण्यात आली होती. मनमुख-गुरुमुख, आध्यात्मिकता, ज्ञान, कर्म, पाच तत्त्व, आंतरिक व बाह्य प्रदूषण यांसारख्या विषयांवरही बालकांनी माहिती दिली. बाल संत समागम यशस्वी करण्यासाठी बाल सत्संग टीमने परिश्रम घेतले.
रमेश वस्त्रकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की प्रत्येक घरात सुख-शांती असावी, मुलं आज्ञाधारक असावीत, पती-पत्नी यांच्यात चांगले नाते असावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र हे सर्व ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर शक्य होते. सत्संगाने जीवनात सकारात्मक बदल घडतात, गुरुमातेच्या मार्गदर्शनाने बंधनमुक्ती मिळते. विश्वासातून श्रद्धा निर्माण होते आणि भक्तीनेच मुक्ती होते, असे ते म्हणाले.
संस्कारामुळेच जगात शांती
सत्संगचे महत्त्व प्रत्येक युगात संतांनी सांगितले आहे. सत्संगात सहभागी झाल्याने सर्व सुखे प्राप्त होतात. बालकांवर होत असलेले संस्कार हेच जगात शांती स्थापन करतील. आई-वडिलांचे आणि गुरूंचे वचन पाळणारी मुले जीवनात नक्की यशस्वी होतात, असे वस्त्रकर यांनी सांगितले. या समागमाने बाल्यावस्थेत संस्कार देण्याची गरज अधोरेखित केली असून, निरंकारी मिशनचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.