मिठागरांच्या जमिन हस्तांतरणाच्या निर्णयावर मीठ उत्पादक संतप्त
भाईंदर येथील मीठ उत्पादक संतप्त
मिठागरांच्या जमिनी हस्तांतरणाच्या निर्णयावर न्यायालयात जाण्याचा इशारा
भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : दहिसर-भाईंदर जोड रस्त्यासाठी मिठागरांच्या जमिनी महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्याच्या केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या निर्णयामुळे भाईंदरमधील मीठ उत्पादक संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
छोटे शिलोत्री सेवा संघ या संघटनेनुसार, हस्तांतरित होणाऱ्या ५३ हेक्टर जमिनींपैकी बहुतेक जमिनी केंद्र सरकारच्या नसून स्थानिक मीठ उत्पादकांच्या मालकीच्या आहेत. या जमिनींच्या मालकी हक्काबाबत त्यांची न्यायालयात लढाई सुरू असताना, परस्पर जमिनी हस्तांतरित करण्याचा अधिकार मीठ विभागाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मीठ उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, उन्नत रस्त्यासाठी भूसंपादन करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि स्थानिक मीठ उत्पादकांना योग्य मोबदला द्यावा. यासंदर्भात, त्यांनी दोन वर्षांपूर्वीच मुंबई महापालिकेला पत्र दिले होते.
दरम्यान, मिठागरांचा मालकी हक्क असतानाही स्थानिक मीठ उत्पादकांना डावलले जाणार असेल, तर या निर्णयाविरोधात लवकरच न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती मीठ उत्पादक छोटे शिलोत्री सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.
म्हणून तीव्र नाराजी
वाणिज्य मंत्रालयाच्या निर्णयात, ५३ हेक्टर जमिन ‘जैसे थे’ तत्त्वावर हस्तांतरित केली जाईल आणि भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर वादाची किंवा नुकसानभरपाईची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची असेल, असे म्हटले आहे; मात्र या जमिनी हस्तांतर करताना स्थानिक मीठ उत्पादकांचा तसेच त्यांच्या नुकसानभरपाई संदर्भात कोणताही थेट उल्लेख झाला नसल्याने मीठ उत्पादकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.