बाजार समिती निवडणूक तातडीने घेण्याची न्यायालयाचे आदेश
बाजार समिती निवडणूक तातडीने घेण्याची न्यायालयाचे आदेश
जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने बाजार समितीला लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीचे उपसभापती हुकूमचंद आमधारे, संचालक धनंजय वाडकर, अशोक वाळुंज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. सुनावणीदरम्यान बाजार समितीचा कोणताही प्रतिनिधी हजर नव्हता. त्यामुळे हा निकाल विरोधात गेल्याचे बोलले जात आहे.
न्यायालयाच्या या आदेशानुसार जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत बाजार समिती कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही. ३१ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.