वसईत एक दिवस अप्पर जिल्हाधिकारी

वसईत एक दिवस अप्पर जिल्हाधिकारी

Published on

विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई तालुक्यातील नागरिकांच्या अपील प्रकरणातील सुनावणीसाठी पालघर येथील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून बुधवार वा गुरुवारी वसईत उपस्थित राहून सुनावणी करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

वसई तालुक्यातील नागरिकांना अपिलाच्या सुनावणीसाठी पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे लागते. त्यात नागरिकांचा दिवसभराचा वेळ जाऊन आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. विशेष: म्हणजे वसईची लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे अपिलात दाखल केलेली ७० ते ८० टक्के प्रकरणे तालुक्यातील असतात. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस वसईत उपस्थित राहून सुनावणी घ्यावी, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीवर मंत्री बावनकुळे यांनी बुधवारी किंवा गुरुवारी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांना तत्काळ शासन आदेश काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे वसईतील नागरिकांची अपिलातील सुनावणीसाठी होणारी फरपट टळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com