जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी
जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी
चार लाख कुटुंबांना नळजोडणी; तीन तालुक्यांत १०० टक्के काम
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील पाच लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी चार लाख ९८ हजार ६२८ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. १५ तालुक्यांपैकी विशेष म्हणजे खालापूर, म्हसळा आणि उरण या तीन तालुक्यांत १०० टक्के नळजोडणी झाली आहे.
केंद्र सरकारकडून जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात ज्या घरामध्ये नळजोडणी आहे त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळजोडणी नाही अशा घरांना नळजोडणी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ९१ टक्के कुटुंबीयांना नळजोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलजीवन योजना यशस्वी कारण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणशी ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे.
............
चौकट :
तालुकानिहाय घरगुती नळजोडणीची संख्या नळजोडणीची टक्केवारी शिल्लक जोडणीची संख्या
अलिबाग ८०.७९,
कर्जत ९०. ९२
खालापूर १००.००
महाड ८९.५५
माणगाव ८९.५५ १,३९८
म्हसळा १००.००
मुरूड ९४.०१
पनवेल ९३.७७
पेण ७८.०८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.