ग्रामीण भागात ग्रामसेवा प्रकल्प सुरू.

ग्रामीण भागात ग्रामसेवा प्रकल्प सुरू.

Published on

ग्रामीण भागात ग्रामसेवा प्रकल्प सुरू
विक्रमगड (बातमीदार) ः श्री चैतन्य हेल्थ ॲण्ड केअर ट्रस्ट व एसबीआय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील पाच गावांमध्ये ग्रामसेवा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातंर्गत विविध क्षेत्राची विकास कामे सुरू असून, त्याचा लाभ या पाच गावांना मिळत आहे.
या ग्रामसेवा प्रकल्पातून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता,पिण्याच्या पाण्याची सोय, उदरनिर्वासाठी भाजीपाला, बियाणे खते, महिला सक्षमीकरण, युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण विविध शासकीय योजनेच्या माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे या भागातील महिलांना व्यवसाय उद्योग मिळालेला आहे.
या भागात पत्रावळी उद्योग, मसाले उद्योग, कापडी पिशव्या उद्योग, मोगरा रोपवाटिका, शिलाई मशीन या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचे काम या ग्रामसेवा प्रकल्पातून सुरू आहे. शाळेसाठी स्मार्ट क्लासेस, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य आधुनिकतेकडे मुलांच्या शिक्षणाची सोयी यांनी उपलब्ध करून दिली आहे. शेती प्रकल्पासाठी या भागातील शेतकऱ्यांना २८ विहिरी, सहा सामूहिक शेततळे खोदून देण्याचे कामे या ग्रामसेवा प्रकल्पातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com