प्लास्टिकबंदी जनजागृती रॅलीचा उपक्रम
पालिका आणि टपाल विभागाकडून प्लास्टिकबंदी जनजागृती रॅली
ठाणे, ता. २४ (बातमीदार) ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी आणि प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ठाणे महापालिका आणि टपाल विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली बुधवारी (ता. २४) काढली होती.
या रॅलीत शेकडो टपाल कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरले आणि प्लास्टिकच्या वापराविरुद्ध आणि कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती केली. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असून, प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणे, कचरा व्यवस्थापन बळकट करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. सरकारी विभागांमधील अशा संयुक्त उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.
रॅली दरम्यान नुक्कड नाटकांद्वारे प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला. कलाकारांनी कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नवी मुंबई टपाल विभागप्रमुख डॉ. अभिषेक इचके आणि ठाणे टपाल विभागप्रमुख नरेंद्र बाबू उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.