विकसनशील देशासाठी समस्यांचे निराकरण आवश्यक

विकसनशील देशासाठी समस्यांचे निराकरण आवश्यक

Published on

विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) ः भारताला सामर्थ्यवान आणि विकसनशील बनविण्याच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व संरक्षण क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे, म्हणून हा ‘जनता दरबार’ भरविण्यात आला. पालघर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशात एका उंच पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम अशा जनता दरबाराच्या माध्यमातून केले जाणार असल्याची आशा पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत ‘जनता दरबार’ विक्रमगड शहरातील आमराई येथे पार पडला. या वेळी सुमारे ८० टक्के प्रश्न सुटले जात असल्याने समाधान मिळत असल्याचे नाईक यांनी सांगितले. या जनता दरबारात २००च्यावर नागरिकांनी आपल्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडल्या. यामध्ये सर्वाधिक समस्या ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वन, शेतजमीन या व अशा विविध विषयांबाबत निवेदनाद्वारे समस्या मांडल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही निवेदनांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे तत्काळ समाधान केले गेले. उर्वरित तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विहित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सर्व वाहने पर्यावरणपूरक
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि इंधन बचतीच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहने विद्युत प्रणालीवर बदलण्याचा निर्धार नाईक यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com