दिबांच्या नावाचा गावोगावी जागर

दिबांच्या नावाचा गावोगावी जागर

Published on

दिबांच्या नावाचा गावोगावी जागर
विमानतळ नामकरणासाठी आंदोलनाची रणनीती
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबईतील २९ गावांत जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रकल्पग्रस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घघाटन होणार आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा अटीतटीचा संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकारने दिबांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. त्यामुळे मोठ्या आंदोलनाची प्रकल्पग्रस्तांकडून तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने नवरात्रीचे औचित्य साधून आगरी-कोळी युथ फाउंडेशन, नवी मुंबईतील सामाजिक संघटनांच्या वतीने २७ गावांमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठीची जनजागृती केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com