नाल्यांमधील कचरा काढण्यासाठी पालिका राबवणार विशेष मोहिम
नाल्यांमधील कचरा काढण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम
२९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी पालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे. २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी संयंत्रे, मनुष्यबळ व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नाल्यांमधील तरंगता कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे हा आहे. विशेष स्वच्छता मोहिमेत नागरिकांच्या सक्रिय सहभागाने महानगर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक ठेवण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.
या मोहिमेत झाडलोट करणे, टाकाऊ वस्तू हटविणे, कचरा संकलन करणे तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ धुऊन काढणे या उपक्रमांचा समावेश असेल. पर्जन्यजल वाहिनी विभाग यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत केली जाईल.
़़़़़़़़़़़़़़़
छोट्या-मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा, जेणेकरून कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत.
- डॉ. अश्विनी जोशी ,
अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर), मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.