जोरदार पावसाचा भातशेतीला फटका

जोरदार पावसाचा भातशेतीला फटका

Published on

जोरदार पावसाचा भातशेतीला फटका
शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची मागणी
मुरबाड, ता. २८ (बातमीदार) ः शनिवारी रात्रीपासून मुरबाड तालुक्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नदी-नाल्यांवरून पाणी वाहू लागल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. तसेच पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला असून, शेतातील उभी असलेली भाताची पिके पाण्यात पडून भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुरबाडच्या शिरगाव, चिखले, शेईमार्गे वासिंदकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळू नदीवरील पुलावर पाणी आले असून, या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. किशोर ते नांदेणीकडे जाणारा रस्ता मुरबाडी नदीच्या पुरामुळे बंद झाला आहे. डेहणोली येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता वापरावा लागत आहे. धसईकडून कांदळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे पाणी साचल्याने तिथेही अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, कल्याण-मुरबाड रस्त्यापासून घोरले गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर नदीचे पाणी येऊन तो रस्तादेखील बंद झाला आहे, असे मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.

पावसामुळे आणि वाऱ्यामुळे भाताच्या रोपांना मोठा फटका बसला आहे. हलवार भाताला लोंब्या आल्या आहेत; मात्र तांदळाच्या दाण्याच्या भरभराटीपूर्वीच पिके पाण्यात पडल्यामुळे पूर्णपणे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे, असे देहरी गावाचे पोलिस पाटील बाळाराम शिंदे यांनी सांगितले. या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष घरत यांनीही तहसीलदारांकडे तातडीने पंचनामे करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com