टोकावडेतील टपऱ्यांवर कारवाई
सरळगाव, ता. २८ (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट महामार्गावरील टोकावडे येथील रस्त्यालगतच्या टपऱ्या हटवल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उपजीविकेचे साधन हिरावल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे गाव आहे. घाटातून जाणारी वाहने येथे विश्रांती घेण्यासाठी व नाश्ता करण्यासाठी थांबत असत. त्यामुळे स्थानिकांनी छोट्या टपऱ्या उभारून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला होता. अनेक तरुण आणि कुटुंबांचा संसार या टपऱ्यांच्या मिळकतीवर चालत होता. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने या टपऱ्या हटवल्याने टपरीधारकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. “नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे छोट्या टपऱ्यांवरच आमचा संसार चालतो. टपऱ्या काढून टाकल्यानंतर आम्ही जगायचे कसे?” असा सवाल संतप्त टपरीधारकांनी केला आहे.
पुनर्वसनाची मागणी
ग्रामपंचायतीने टपरीधारकांचे पुनर्वसन करावे, छोटे गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी टपरीधारकांच्या वतीने राजेश भांगे यांनी केली आहे. तसेच, मुरबाडचे आमदार किसन कथोरे व वनमंत्री गणेश नाईक यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही येथील टपरीधारक करत आहेत.
कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे येथे रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेल्या टपऱ्यांना हटवण्याची नोटीस १५ दिवसांपूर्वी टपरीधारकांना दिली होती. नोटीसमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे टपरीधारकांनी टपऱ्या हटवल्या आहेत.
- धनाची टीले, राष्ट्रीय महामार्ग, अधिकारी
मुरबाड : मुरबाड-टोकावडे नाक्यावरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या तोडण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.