वादळी पावसाने बळिराजी चिंतित

वादळी पावसाने बळिराजी चिंतित

Published on

वादळी पावसाने बळीराजा चिंतित
उरण तालुक्यातील भातशेतीला फटका
उरण, ता. २८ (वार्ताहर)ः परिसरात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या वादळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. भातपीक तयार होण्याआधीच आडवे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होणार आहे.
मराठवाड्यात पावसाच्या हाहाकाराने बळीराजा उद्ध्वस्त होत असताना कोकणातील भातशेतीला वादळी पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने उरण तालुक्यातील पूर्व विभागातील भातशेती आडवी केली आहे. पावसाचा कहर असाच सुरू राहिला, तर ही भातशेती कुजण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाने आधार देऊन शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे, तर कृषी सहाय्यकांना प्राथमिक अंदाज घेण्यासाठी सांगितल्याचे उरणच्या तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ यांनी माहिती दिली आहे.
------------------------------
आर्थिक भुर्दंड सहन करून शेतकरी भातशेती करीत आहे. भातपीक जोमात आले असतानाच वादळी पावसाने आडवे केले आहे. सततच्या पावसामुळे भातशेती कुजण्याचा धोका जास्त असल्यामुळे कृषी विभागाने आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे.
- प्रफुल्ल खारपाटी, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com