भूमिपुत्रांचा निर्वाणीचा इशारा
भूमिपुत्रांचा निर्वाणीचा इशारा
विमानतळाला दिबांच्या नावाच्या अधिसूचनेची मागणी
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्राकडून अंतिम अधिसूचना काढली गेलेली नाही. त्यामुळे भूमिपुत्रांमधून नाराजी असून नाव नाही दिले तर विमानतळाचे उद्घघाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे यांनी रविवारी (ता. २८) कोपरखैरणे येथील शेतकरी समाजमंदिरामध्ये बैठक घेतली. या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने मंजूर करूनही केंद्राकडून अद्याप निर्णय झालेली नाही. त्यामुळे उद्घघाटनापूर्वी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले नाही तर संघर्ष अटळ असल्याची भूमिका घेतली.
---------------------------------------
६ ऑक्टोबरला मोर्चा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या अंमलबजावणीसाठी ६ ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सागरी जिल्ह्यातील जवळपास लाख भूमिपुत्र सामील असतील, अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. या वेळी ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.