तिसऱ्यांदा बारवी धरण ओव्हर फ्लो
तिसऱ्यांदा बारवी धरण ओव्हरफ्लो
पर्यटकांची गर्दी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बदलापूर, ता. २९ (बातमीदार): बदलापूरजवळील बारवी धरण यंदा पावसाळी मोसमात तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाले असून, सर्व दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी बारवी धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. ठाणे जिल्ह्यासह मुरबाड, कल्याण, डोंबिवली येथून पर्यटकांनी बारवीकडे सायंकाळी मोठ्या संख्येने धाव घेतली.
बदलापूरपासून सुमारे सात ते आठ किमी अंतरावर असलेल्या या धरणात सततच्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. यामुळे बारवी नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिसर अधिकच आकर्षक झाला आहे. बारवी धरणाच्या काठावरचे धबधबे, ओसंडून वाहणारी नदी, आणि धरणाचा आवाज – हे सर्व पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून, अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ कैद करत धरण परिसराचा आनंद घेतला, मात्र यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने धरण परिसर व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पाणीपातळी अधिक वाढल्यास नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते, याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नागरिकांना दिलासा
बारवी धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याच्या शेवटीही धरण काठोकाठ भरल्याने, पुढील काही महिन्यांसाठी जलसाठा पुरेसा असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.