शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Published on

कासा, ता. २९ (बातमीदार) ः गेल्या चार दिवसांपासून डहाणू तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेती, घरे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः भातशेतीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. कापणीस आलेले भात पाण्यात बुडाले असून अनेक ठिकाणी आडवे पडल्याने पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे मेहनत करून उभे केलेले पीक वाया जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

जामशेतपाटील पाडा येथील शेतकरी स्नेहल पोतदार यांच्या वाडीतही मोठे नुकसान झाले आहे. अनेक आंब्याची झाडे, केळीची बाग व इतर झाडे पडल्याने नुकसान झाले असून, कुंपणाची भिंत कोसळली आहे, तसेच घराच्या शेडचेही मोठे नुकसान झाले आहे.

सावटा परिसरातही मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य भिजले असून घरात चिखल साचला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुरबाड-वांगर्जे येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी, जेणेकरून उभारी मिळू शकेल.

तीन दिवसांपासून पीक पाण्यात
कासा येथील शेतकरी रघुनाथ गायकवाड यांनी सांगितले, की हाता-तोंडाशी आलेले पीक तीन दिवसांपासून पाण्यात पडल्याने वाया जात आहे. मोठा खर्च करून शेती केली, ती वाया जात आहे. सरकारने लवकर पंचनामे करून मदत द्यावी.

पंचनाम्याला सुरुवात
डहाणूतील कृषी अधिकारी अनिल नरगुळकर यांनी सांगितले, की मुसळधार पावसाने नदी-नाल्यांच्या शेजारील शेती नुकसानग्रस्त झाली आहे. कृषी विभागाचे कर्मचारी आज (ता. २९)पासून पाहणी सुरू करून पंचनामे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com