मोखाड्यात अतिवृष्टीने १५४ हेक्टर क्षेत्र बाधीत

मोखाड्यात अतिवृष्टीने १५४ हेक्टर क्षेत्र बाधीत

Published on

मोखाडा, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यात मागील तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने ५४ गावांतील १५४ हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सुमारे एक हजार २९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसास्तग्रस्त भागाची प्राथमिक पाहणी केल्यानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला सादर केला आहे.

मोखाड्यात पावसाच्या पाण्यावर केवळ खरिपाचेच पीक घेतले जाते. येथे कारखानदारी नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. याच पिकावर शेतकरी वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अतिवृष्टीने लोंबात आलेले पीक शेतातच आडवे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे खरिपाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मोखाडा तालुका कृषी विभागाने पाहणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आकाश सोळुंखे यांनी दिली आहे.

तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वर्षभर कुटुंबाची गुजराण कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. उपासमारीचा सामना करावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी.
- हनुमंत पादीर, शेतकरी, सावर्डे, मोखाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com