भातपीक भुईसपाट झाल्याने उत्पादन घटणार

भातपीक भुईसपाट झाल्याने उत्पादन घटणार

Published on

बोर्डी, ता. २९ (बातमीदार) : चार दिवस झालेल्या बेसुमार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. चार महिन्यांपासून केलेली मेहनत वाया गेली आहे. शेतातील भातपीक भुईसपाट झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चालू वर्षी जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली होती. नांगरणी, चिखलणी, बियाणे पेरणी, लावणी, निंदणी अशा कामासाठी त्यांनी आपल्या खिशातील पैसा व अंगमेहनतदेखील लावली आहे, मात्र अगदी कणसे येण्याच्या वेळेलाच गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस पडल्यामुळे शेतातील पीक भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे फळझाडांचे नुकसान झाले असताना दुसरीकडे भातशेतीचे नुकसान झाल्यामुळेच शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. सरकारच्या कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com