भिवंडीत पावसाचा भातशेतीला फटका
भिवंडीत पावसाचा भातशेतीला फटका
शेकडो हेक्टर पाण्याखाली; शेतकरी हवालदिल
भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : परतीच्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कणीस लागलेले पीक कापणीच्या तयारीत असतानाच पावसाने शेतातील पिके आडवी झाली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
भिवंडी तालुक्यात १६ हजार ६८९ हेक्टर भात लागवड क्षेत्र आहे. यावर्षी अतिशय समाधानकारक पाऊस पडल्याने तालुक्यात भातपीक जोमाने आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ८५ हेक्टर क्षेत्रावरील हळवा भातपिकाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक स्थळ पाहणी सर्वेक्षणात निदर्शनात आले आहे, हातातोंडाशी आलेले पीक आडवे होत पाण्याखाली आल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी शिवाजी राऊत यांनी केली आहे.
पंचनामे करणार
पुढील काही दिवस अजून पावसाचा अंदाज आहे. पुढच्या आठवड्यात कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.