५ वर्षात २ कोटी ५० लाख बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट

५ वर्षात २ कोटी ५० लाख बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट

Published on

५ वर्षात २ कोटी बांबू लागवडीचे उद्दिष्ट ः गणेश नाईक
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच विरारच्या शिरसाड फाटा येथे बांबू रोप वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आगामी पाच वर्षात दोन कोटी ५० लाख बांबू लागवड करणार असल्याचेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियनांतर्गत वसई-विरार महापालिका आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख बांबू रोप वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणेश नाईक म्हंटले की, आदिवासी शेतकऱ्यांना वन पट्ट्याचे वाटप करण्यात आले. बांबू ही प्रजाती झपाट्याने वाढणारी आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना याचा आर्थिक स्वयंरोजगारासाठी लाभ होणार आहे. राज्याच्या वनविभागाचे पाच वर्षात दोन कोटी ५० लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून या एक वर्षात १० लाख बांबू लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com