पूरग्रस्तांसाठी एपीएसीत आज मदतफेरी
पूरग्रस्तांसाठी एपीएसीत आज मदतफेरी
तुर्भे, ता.२(बातमीदार): मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून कांदा-बटाटा बाजार आवारातून मदत करण्याचे आवाहन माजी संचालक अशोक वाळूंज यांनी केले आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता.३) बाजारात मदतफेरीतून मुख्यमंत्री निधीसाठी मदत संकलित केली जाणार आहे.
मराठवाडातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला नैतिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देणे अत्यंत आवश्यक आहे. त्या करिता मुख्यमंत्री सहायता निधी संकलित करण्यासाठी संघटनेचे कार्यकारी मंडळ, संचालक अशोक वाळूंज व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता.३) मदतफेरीच्या माध्यमातून मदतीचा धनादेश स्वीकारण्यात जाणार आहे. यावेळी तुर्भे कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ, या नावाने देणगीचा धनादेश देण्याचे आवाहन वाळूंज यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.