पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी संकटात

पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी संकटात

Published on

शहापूर, ता. २ (वार्ताहर) : तालुक्याला काही महिन्यांपासून जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे २५० हेक्टर शेतीक्षेत्रातील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेली पिके पाणथळ जमिनीवर पडल्याने मातीमोल ठरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातपिकांना पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे ऐन जोमात येण्याच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नाचणीचे पीक हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या थैमानामुळे शेकडो हेक्टरवरील भातशेती पाण्याखाली जाऊन पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे बळीराजाच्या हाता-तोंडाला आलेला घास निसटला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून भातशेती केली आहे; परंतु आसमानी संकटामुळे बळिराजा संकटात सापडला आहे.
तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २५० हेक्टरवरील भातपिके नुकसानग्रस्त ठरली आहेत. नाचणीचे १५ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे.
शहापूर तालुक्यातील बहुतेक शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे, कमी लागवडीच्या क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याने मिळणारी सरकारी मदतही अपुरी ठरते. यामुळे शेतकरी दोन्ही बाजूंनी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सततच्या पावसामुळे पिके कुजू लागली आहेत आणि शेतांमध्ये चिखल भरून राहिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पिके जोम धरतात; मात्र सध्या सतत पाऊस सुरू असल्याने भातपिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहापूर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर

शहापूर : तालुक्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला असून, गावागावांतील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com