अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Published on

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
मुरबाड, ता. २ (बातमीदार) : राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार एकटे सोडणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २) मुरबाड येथे दिले. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी पुराच्या गाळाने भरल्या आहेत, तो गाळ उपसण्याचे काम सरकार करेल, असेही ते म्हणाले.
जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने यापूर्वीच २,२०० कोटी रुपयांची मदत दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शेतकऱ्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुरबाड रेल्वे प्रकल्प आणि येथील बंद पडलेल्या कारखान्यांबाबत लक्ष देण्याचे आश्वासन दिले, तसेच बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर ''मकोका''लावण्याचा इशाराही दिला.
या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद परांजपे, आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला, ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भरत गोंधळे, महिला अध्यक्षा कल्पना तारमळे, हेमलता पाटील, युवक अध्यक्ष प्रतीक हिंदुराव, ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ज्योतीताई हिंदुराव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com