ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईच्या बाहेर

ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईच्या बाहेर

Published on

ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईच्या बाहेर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ न्युज नेटवर्क
मुंबई, ता. २ ः शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवायचे काम ठाकरे यांनी आजपर्यंत केले. मुंबई महापालिका ३० वर्षे लुटली, मराठी माणूस ठाकरेंमुळेच मुंबईबाहेर गेला आहे. मुख्यमंत्रिपदाचीही लालसा त्यांना सुटली नाही. म्हणून त्यांच्या पक्षाची अवस्था अशी आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता आणणार असून, गल्ली ते दिल्ली महायुतीची सत्ता असली पाहिजे, अशी भावना त्यांनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली.
गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा पार पडला. या वेळी शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही. फेसबुक लाइव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्तीत घरात बसणारा बाळासाहेबांना शिवसैनिक असूच शकत नाही. संकटात कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात दिसला पाहिजे. आमचा कार्यकर्ता खाली हाताने गेला नाही. सगळे घेऊन गेला. जीवनावश्यक वस्तू घेऊन गेला. शेतकऱ्याने फोन करून आमच्याकडे कृतज्ञता बोलून दाखवली की, हे तुमच्या शिवसैनिकाने येऊन केले. त्या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
...
मोदी सरकारने १० लाख कोटी दिले!
लाडकी बहीण, योजना, एक रुपयात पीक योजना यासारख्या योजना, मुंबईतील टोलबंदी यासारखे निर्णय आम्ही घेतले. आम्ही आतापर्यंत देण्याचे काम केले आहे. हे काम फक्त मीच करीत नाही, तर माझे लाखो शिवसैनिक करीत आहेत. मी मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटींचा निधी दिला. तुम्ही काय केले? तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायचा अधिकार नाही. त्यांनी महाराष्ट्राला लाखो कोटींचा निधी दिला आहे. जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता, तेव्हा अमित शहा यांनी १० हजार कोटी रुपये टॅक्स माफ केला. यूपीए सरकारने १० वर्षांत फक्त दोन लाख कोटी दिले; तर १० वर्षांत मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले, असेही शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
...
रा. स्व. संघाला शुभेच्छा!
बाळासाहेबांचे राम मंदिर बांधण्याचे आणि ३७० कलम हटवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. त्यांच्यावरच तुम्ही टीका करीत आहात. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आरएसएसवरही तुम्ही टीका करता. जेव्हा जेव्हा संकटे येतात, तेव्हा तेव्हा ते धावून जातात. राष्ट्रभक्त आरएसएसवरही तुम्ही टीका करता. १००व्या वर्धापनदिनानिमित्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा देतो.
...
शिंदे म्हणाले...
- मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही
- शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार
- तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी दिला का?
- पूरग्रस्त भागातील मुलांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार
- बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com