कल्याण-शिळ महामार्गावरील कोंडी सोडवा
कल्याण-शिळ महामार्गावरील कोंडी सोडवा
माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण-शिळ महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिक मोठ्या त्रासात आहेत. नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना दररोज किमान दोन ते अडीच तास या कोंडीत घालवावे लागतात. यामुळे अनेकदा वेळेवर नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामांवर पोहोचणे कठीण होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांशी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदनाद्वारे कोंडीची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे.
कल्याण-शिळ महामार्गावरील मुख्य कोंडीची ठिकाणे म्हणजे कल्याणफाटा ते पत्रीपूल आणि नवी मुंबईकडून येताना महापे रोड तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याणफाटा असा भाग. या मार्गांवर वाहतूक जाम होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे दररोज मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग ये-जा करतो.
कोंडीमुळे रुग्णवाहिका तासन्तास अडकून राहतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वाहतूक अडचणींमुळे व्यापार आणि व्यवसायदेखील मोठ्या संकटात आहे. नागरिकांमध्ये या समस्येवर त्वरित तोडगा न निघाल्यास प्रचंड नाराजी आणि रोष निर्माण झाला आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांनी या गंभीर समस्येवर लक्ष देऊन कल्याण-शिळ महामार्गावरील कोंडी त्वरित सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.