कल्याणमध्ये पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन
कल्याणमध्ये पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण (साहित्य शाखा) यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आणि ह.भ.प. लक्ष्मण आव्हाड दातली यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कवी संमेलन रविवारी (ता. ५) पार पडले. यावेळी काव्यलेखन स्पर्धा, पारितोषिक वितरण व समाजरत्न (साहित्य) पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी रविंद्र कांगणे असून, उद्घाटन ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विजय पंडित यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी गीतकार अरुण म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड असून स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक आहेत.
समाजरत्न (साहित्य) पुरस्कार यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड यांना प्रदान करण्यात आला. या संमेलनात निमंत्रित कवींचा कविसंमेलनाचा कार्यक्रम झाला. यात विवेक उगलमुगले (नाशिक), जयश्री वाघ (सिन्नर), शिल्पा संखे (पालघर), दया घोंगे (डोंबिवली), अजित मालंडकर (कल्याण), रतन पिंगट (येवला), लता गुठे (मुंबई), भास्कर गीते (नांदेड) आदी नामवंत कवी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.