रस्ते डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे
डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे
ठेकेदार, अभियंत्यांवर कारवाईची मागणी
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिजन्सी दावडी येथील रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या चार दिवसांपूर्वी करण्यात आले होते; मात्र निकृष्ट कामामुळे चार दिवसांतच या रस्त्यावरील डांबर उडून गेले असून केवळ खडी उरली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची आणि त्यांचे बिल तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.
सत्यवान म्हात्रे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे, की नागरिकांना फसवणे बंद करा. या कामांमध्ये आमदार-खासदारांचा संबंध नसून, प्रशासनच भ्रष्ट असल्याने नागरिक या महानगरपालिकेला ‘दरोडेखोर महापालिका’ संबोधत आहे. रस्त्याच्या कामांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, की डांबरीकरण करताना डांबर न टाकता फक्त रंग लावलेली खडी टाकली जात आहे. त्यामुळे खडी निघून जात असून रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत.
एकीकडे रस्त्यांची अशी अवस्था असताना, दुसरीकडे केडीएमसीकडून २७ गावांमध्ये मालमत्ता जप्तीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यावर म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत, आधी मूलभूत सोयीसुविधा द्या, नंतर मालमत्ता जप्ती करा, असे स्पष्ट केले. या सर्व प्रकारासाठी जबाबदार असलेल्या निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी म्हात्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.