
नवी मुंबईत रिक्षाचालकांना ओळखपत्राचे वावडे
गणवेशासह बॅच बंधनकारक असतानाही दुलर्क्ष
वाशी, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबईतील रिक्षा चालकांना गणवेशासह बॅच ओळखपत्र लावणे बंधनकारक असले तरी अनेकजण या नियमाला फाटा देत आहेत. महाराष्ट्र राज्य मोटार वाहन कायद्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या सुधारणानुसार, रिक्षाचालकांनी गणवेशासह ओळखपत्र लावणे सक्तीचे आहे. या ओळखपत्रावर चालकाचे फोटो, नाव, पत्ता, बॅच क्रमांक व इतर माहिती नमूद केलेली असते, ज्यामुळे प्रवाशांना अधिकृत रिक्षाचालकाची सहज ओळख होऊ शकते.
नवी मुंबईमध्ये सुमारे ३२ हजार अधिकृत रिक्षा आहेत आणि सर्व चालकांना आरटीओकडून ओळखपत्र वितरित केले गेले आहेत. तरीही अनेक रिक्षाचालक, विशेषतः सायबर नगरीत, गणवेश घालणे किंवा ओळखपत्र लावणे टाळत आहेत. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गांवडे यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येते. नियम पाळणारे रिक्षाचालक प्रवाशांसाठी सुरक्षित असतात आणि त्यांच्या सेवा गुणवत्तेची खात्री देता येते. ओळखपत्र नसलेल्या रिक्षाचालकांची ओळख पटविणे कठीण जाते, तसेच तक्रारी करण्यासही अडचणी येतात. तर प्रवासी प्रिती सुमरा यांनी सांगितले की, काही रिक्षाचालक हे त्यांच्या बॅच ओळखपत्रासह रिक्षा चालवतात, मात्र बहुतेक नियमाला दुर्लक्ष करतात. यामुळे अधिकृत आणि बेकायदा रिक्षाचालकांची वेगळी ओळख होत नाही. बॅच लावल्यास प्रवाशांना सुरक्षितता आणि तक्रार नोंदवण्याची सुविधा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.