भिवंडी तालुक्यात ३०१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

भिवंडी तालुक्यात ३०१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Published on

भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका भिवंडी तालुक्यातील भातशेतीलाही बसला आहे. एकूण ९२५४ शेतकऱ्यांच्या ३०१६.५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.
सरकारच्या आदेशानुसार महसूल विभाग, कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त माध्यमातून पंचनामे करण्यात आले. कृषी विभागाने ४० गावांतील १५५४ शेतकऱ्यांच्या ४६३.६२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केले. महसूल विभागाने ७३ गावांतील २९४० शेतकऱ्यांच्या ४९७.८८ हेक्टर शेतीचे पंचनामे केले, तर पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी ११९ गावांतील ५७६० शेतकऱ्यांच्या २०५५.०० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले. एकूण ३०१६.५० हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे पूर्ण होऊन हा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना सरकारच्या निर्णयानुसार योग्य ती नुकसानभरपाई लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार खोले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com