भात उत्पादक शेतकरी उद्धवस्त

भात उत्पादक शेतकरी उद्धवस्त

Published on

कापलेले पीक पाण्यावर तरंगले
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) ः भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात ऐन दिवाळीच्या काळात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भात उत्पादक शेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. दसरा ते दिवाळी या काळात शेतकरी शेतात पिकलेले भात कापून, सुकवून घरी नेत असतात; मात्र यंदा दसऱ्यानंतर आणि दिवाळीदरम्यान अवकाळी पावसाने अनेक वेळा हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातात पाणी शिरले आहे.
शेतात कापून ठेवलेले भात आता पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या पावसाने भातपिकावर रोग आला होता, तर आता हे पिकलेले भातपीक पाण्यात सडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत शेतकरी शिवाजी राऊत यांनी माहिती दिली, की तालुक्यात अवकाळी पावसाचे पंचनामे झाले आहेत; परंतु शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com