नाखवा, खलाशी माघारी
नाखवा, खलाशी माघारी
वादळसदृश वातावरणामुळे बोटी किनाऱ्यांवर
मुरुड, ता. २७ (बातमीदार)ः वादळसदृश वातावरणामुळे मच्छीमार बोटी मुरूडसह एकदरा, आगरदांडा, राजपुरीतील बंदरांवर आश्रयाला आहेत. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामात काहीतरी पदरी पडेल, या आशेने निघालेले नाखवा, खलाशांना माघारी परतण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीकरिता गेल्या होत्या, परंतु पुन्हा हवामानात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू लागल्याने जवळ समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी तसेच काही मोठ्या बोटी एकदरा खाडीत, मुरूड किनाऱ्यावर येऊ लागल्या आहेत. यामुळे मासेमारी करणारे कोळीबांधवांवर पुन्हा उपजिविकेचे संकट निर्माण झाले आहे. या वादळसदृश वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, सध्या बाजारपेठेत मासळीचा पुरवठा कमी झाल्यामुळे भाव कडाडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

