कल्याणमध्ये पाण्याची नासाडी
कल्याणमध्ये पाण्याची नासाडी
जेसीबीचालकांच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिनी फुटली
कल्याण, ता. २७ (बातमीदार): विठ्ठलवाडी स्मशानभूमीबाहेरील वालधुनी नदीच्या पुलावरून जाणारी मुख्य जलवाहिनी सोमवारी (ता. २७) सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. या घटनेमुळे परिसरातील पाणीपुरवठा काही काळ खंडित झाला किंवा कमी दाबाने झाला.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की शहरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांना जेसीबी चालकांचे सुपरव्हिजन नसलेले निष्काळजी खोदकाम कारणीभूत आहे. जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येताच पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. यापूर्वीही अशा घटनांमध्ये संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना नुकसानभरपाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, पण परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. यापुढे जबाबदारी निश्चित करून झालेल्या नुकसानीचीभरपाई संबंधितांकडून कठोरपणे वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकाराबद्दल नागरिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

