परतीच्या पावसाने पडघ्यात भातशेतीचे नुकसान
पडघा, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात परतीच्या पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणी करून वाळवण्यासाठी ठेवलेले पीक मुसळधार पावसामुळे भिजून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
पडघा परिसरातील शेकडो खेडी, पाड्या आणि गावांतील शेतकरी सेवा सहकारी संस्थांकडून शेतीसाठी कर्ज घेऊन भातपिकावर उदरनिर्वाह करतात. यावर्षी पावसाळ्यात पाऊस चांगला पडल्याने भातशेती बहरली होती. मात्र, लोबें तयार होण्याच्या काळात झालेल्या मुसळधार पावसाने उभी शेती आडवी झाली. या नुकसानीचे सरकारकडून पंचनामे करण्यात आले असले तरी भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दिवाळीच्या सुमारास तयार झालेली भातशेती अनेकांनी कापून वाळवण्यासाठी शेतात ठेवली होती. परंतु, सलग तीन दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे ती भातशेती पाण्याखाली गेली. परिणामी, शेतकऱ्यांचे महिन्यांच्या कष्टाचे श्रम वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भातशेतीचे परतीच्या पावसाने आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने भातशेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा कुणबी सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करील.
- रमेश शेलार, तालुका संघटक, कुणबी सेना यांनी दिला.
पडघा : परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली कापलेली भातशेती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

