''महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं''
‘महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं’
मनसेच्या फलकाने ठाणेकरांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाण्यातील नितीन कंपनी चौक हा पुन्हा एकदा राजकीय फलकबाजीमुळे चर्चेत आला आहे. भाजपने काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी विरोधकांना डिवचणारे फलक लावल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं’ या आशयाचे फलक लावले आहेत. यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी ही फलक संकल्पना साकारली आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतीकात्मक संदर्भ यातून मांडण्यात आला आहे. फलकात दोन पिढ्यांची राजकीय परंपरा दाखवण्यात आली आहे, जी जनतेच्या आशीर्वादाने पुढे जात आहे. जयघोष करणारा जनसमुदाय, उत्साही कार्यकर्ते आणि आकाशातील प्रकाश या दृश्यांमधून ‘जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं’ हा भावनिक संदेश दिला जात आहे.
‘राजकीय पुनर्मिलन’
राज्यात सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या मोठ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर या फलकातील ‘दोन पिढ्यांची एकत्रता’ हा ‘राजकीय पुनर्मिलनाचा संकेत’ देत आहे. या संदेशाबद्दल बोलताना स्वप्नील महिंद्रकर यांनी विश्वास व्यक्त केला, की २० वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र आले असून, मराठी माणसाचे स्वप्न आता वास्तवात उतरले आहे. येत्या काळात मराठीसाठीचा लढा आणखी तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील.
राजकीय चर्चेचे केंद्र
फलकाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय संदेश आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी यावर चर्चा सुरू झाली आहे. नितीन कंपनी चौक परिसर पुन्हा एकदा राजकीय चर्चेचे केंद्र बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

