भाजपचे प्रेम फक्त निवडणुकीपुरतं
भाजपचे प्रेम फक्त निवडणुकीपुरतं
इफ्तार पार्टीच्या फोटोवरून मनसेचे राजू पाटील यांचा घणाघात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर थेट घणाघात करीत भाजपचे आगरी-कोळी-भूमिपुत्र प्रेम आणि सर्व समाजांशी स्नेह केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करून पाटील यांनी भाजपच्या या ‘सामाजिक प्रेमाच्या राजकारणा’वर जोरदार टीकास्त्र सोडले.
राजू पाटील यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले, की इफ्तार असो वा गणपती, निवडणुका आल्या की सर्व समाज आठवतो. पण सत्तेत गेल्यावर तेच समाज विसरले जातात. पाटील यांच्या या तीव्र विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी अलीकडेच भाजपवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या पोस्टला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
२७ गावांच्या प्रश्नावरून भाजप जबाबदार
यापूर्वीही राजू पाटील यांनी २७ गावांच्या प्रश्नावरून भाजपला जबाबदार धरले होते. त्यांनी म्हटले होते, की कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळणार, असं सांगून संघर्ष समितीचे सदस्य भाजपने निवडून आणले. त्या गावांच्या विकासासाठी ६,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिलं, पण आजतागायत एक छदामही दिला नाही. एवढाच प्रेमाचा पुळका असेल तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव का देत नाहीत, असा भेदक सवाल विचारला.
यासोबतच पाटील यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही भाष्य करीत दुबार मतदार असोत वा राजकीय यादीतील फेरफार, त्यावरून स्वतःच्या मंत्र्यालाच अडचणीत आणून मंत्रिपदावर डोळा ठेवला जातो, अशी सूचक टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

