आंबा बागायतदार धास्तावले

आंबा बागायतदार धास्तावले

Published on

आंबा बागायतदार धास्तावले
मोहोर आला नसल्याने उत्पादन घटणार
श्रीवर्धन, ता. ४ (वार्ताहर)ः अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील आंबा पीक घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर उजाडला तरी अजून मोहोर येण्यास सुरुवात झाली नसल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात नारळ, रोठा सुपारी खालोखाल आंब्याचे पीक घेतले जाते. कोकणातील डोंगर उताराच्या जमिनी आंबा पिकास उपयुक्त आहेत. तालुक्यात १,९१० हेक्टर क्षेत्रात नव्वद टक्के हापूस, तर १० टक्के पायरी, केसरची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी सत्तेचाळीस हजार टन आंब्याचे उत्पादन तालुक्यात होते. साधारणपणे आक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. जानेवारीअखेर पीकधारणा सुरू होते, परंतु यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने मोहोर येण्यास सुरुवात झालेली नाही.
---------------------------------
रोगराईची शक्यता
फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये मोहोर येण्यास सुरुवात होते, तर फळधारणा साधारण तीन महिन्यांनी म्हणजेच जूनच्या दरम्यान होते. याच दिवसात ढगाळ वातावरण, पावसाला सुरुवात होत असल्याने फळांवर किडी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
-------------------------
पाऊस अद्यापही पडत असल्याने थंडी लांबणार आहे. त्यामुळे मोहोर येण्यास उशीर होणार असल्यामुळे फळधारणा पावसाळी दिवसात होणार आहे. त्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे.
- मंगेश कर्णेकर, आंबा बागायतदार, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com