कृषी बंधाऱ्याचे काम अपूर्ण स्थितीत; शेतकरी सिंचनापासून वंचित
कृषी बंधाऱ्याचे काम अपूर्ण
निधी मंजूर, तरीही शेतकरी सिंचनापासून वंचित
तारापूर, ता. ७ (बातमीदार) ः पालघर तालुक्यातील शिगाव येथे कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्याचे काम निकृष्ट आणि अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील ९० ते १०० शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या बंधाऱ्यासाठी अंदाजे १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
एप्रिल महिन्यात कामाला सुरुवात झाली असून, कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे बंधारा अर्धवट राहिला आहे. बांधकाम करताना पाणी साठवणुकीसाठी आवश्यक असलेला माती आणि गाळ काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आवश्यकता नसताना बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला चर खोदल्याने बाजूच्या जागेची धूप होऊन बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जर हे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर पावसाळ्यात पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी सिंचनाची सोय मिळाली असती; मात्र अपूर्ण कामामुळे या हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार नाही. या बंधाऱ्यामुळे बारमाही पिके घेणे, जमिनीची धूप थांबवणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे शक्य होणार होते.
----------
काम करून घेऊ!
शिगाव येथील बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. कंत्राटदाराला अजूनपर्यंत कामाच्या बिलाची रक्कम देण्यात आली नसून त्याच्याकडून अंदाजपत्रकानुसार काम करून घेण्यात येईल, अशी माहिती पालघरचे उपतालुका कृषी अधिकारी संजय वाघ यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

