शेतकऱ्यांच्या अश्रूंना दिलासा देण्यासाठी आम्ही गेलो
शेतकऱ्यांच्या अश्रूंना दिलासा देण्यासाठी आम्ही गेलो ः प्रताप सरनाईक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : दिवाळीत आम्ही फटाके फोडत बसलो नाही, तर शेतकऱ्यांच्या अश्रूंना दिलासा देण्यासाठी त्यांच्या दारात गेलो, अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मराठवाडा दौऱ्यात केली आहे. ठाण्यातील भाईंदरपाडा येथे महिला वस्तीगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही नेते दौरे करत आहेत. पण, आमचं काम लोकांपर्यंत विकास पोहोचवणं आहे, राजकारण करणं नाही. वनमंत्री गणेश नाईक यांना भाजपकडून ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी नेमण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीत कोणत्याही गोंधळाची शक्यता नाही. प्रत्येक मंत्री आपल्या जिल्ह्याचा प्रभारी असेल आणि सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यानेच घेतले जातील. ही महायुती म्हणजे फेविकॉलचं जोड असून ते अत्यंत मजबूत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंवरही निशाणा
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विकासकामे कशी केली जातात हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून शिकवणी घ्यावी, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

