भारत-चीन मैत्रीचे संबंध अधिक बळकट होतील
चीनचे मुंबईतील दूतावास किन जी यांचा विश्वास

भारत-चीन मैत्रीचे संबंध अधिक बळकट होतील चीनचे मुंबईतील दूतावास किन जी यांचा विश्वास

Published on

भारत-चीन मैत्रीचे संबंध अधिक बळकट होतील
चीनचे वाणिज्य दूत किन जी यांच्या हस्ते ‘बियाँड बॉर्डर्स बिटवीन हर्टस्’चे प्रदर्शन

मुंबई, ता. ८ : भारत आणि चीनचे संबंध हे मैत्रिपूर्ण राहिलेले आहेत. त्याच्यातील आध्यात्मिक दुवा कायमच राहिला असून, चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षणाचे अनेक दरवाजे खुले आहेत. चीनमधील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना संधी खुणावत असून, या संधींतून भारत आणि चीनच्या मैत्रीचे संबंध अधिक बळकट होण्यास मदत मिळेल, असा विश्वास शनिवारी (ता. ८) चीनचे मुंबईतील वाणिज्य दूत किन जी यांनी व्यक्त केला.


सेंट झेवियर्स महाविद्यालयात मुंबईतील चीन दूतावास, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, म्युझियम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रकार गोपाल एम. एस. यांनी चीनमध्ये विविध शहरे, भागांमध्ये टिपलेल्या छायाचित्रांचे ‘बियाँड बॉर्डर्स बिटवीन हर्टस्’ नावाने चित्रप्रदर्शन भरवले असून, त्या उद्‍घाटनप्रसंगी किन जी बोलत होते. या वेळी सेंट झेवियर्सच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्ण, ‘एआयएचसीए’च्या विभागप्रमुख अनिता राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, चित्रकार, साहित्यिक आदी मान्यवर उपस्थित होते. किन जी पुढे म्हणाले, ‘भारताप्रमाणेच चिनी संस्कृतीची समृद्धता आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे साधर्म्य आहे. ते साधर्म्य आज येथे लावण्यात आलेल्या चीनमधील विविध ठिकाणच्या छायाचित्रांमधून दिसून येते. चीनमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये नवनवीन संशोधनाचे क्षेत्र विस्तारत असून, त्यात भारतीय विद्यार्थ्यांना संधी मिळेल.’ या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून या संधीतून अधिक दुवा साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी प्राचार्या डॉ. गोकर्ण यांनी सेंट झेवियर्सच्या शैक्षणिक वाटचालीत कला, शिक्षण यांचे असलेले नाते स्पष्ट केले, तर एआयएचसीएच्या विभागप्रमुख अनिता राणे यांनी सेंट झेवियर्समध्ये पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात चीनच्या नागरिकरणासारखे विषय शिकवले जात असल्याची माहिती देत त्यासाठीचा वारसा सांगितला.

...
शांघाय ते डुनहुआंगपर्यंत प्रवास
ऑक्टोबर २०२४ मध्ये चित्रकार गोपाल एम. एस. यांच्यासह चीनमधील विविध प्रांतात जाऊन महाराष्ट्रातील आठ चित्रकार आदींनी चीनमधील पूर्वेकडील शांघाय ते सिल्क रोडवरील डुनहुआंगपर्यंत प्रवास केला. त्यात त्यांनी विविध शहरे, तेथले वेगळेपणाची छायाचित्रे काढली. यात तेथील लोकांचे प्रेमळ, उत्साही स्वभाव, त्यांचे संवाद अशा अनेक बाबी यातून समोर आल्या असून, त्याची माहितीही या चित्रप्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी देण्यात आली. मुंबईत हे भरलेले चित्रप्रदर्शन सोमवार, १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com