जनता दरबारात समस्या सोडविण्याचे आमदारांचे आश्वासन

जनता दरबारात समस्या सोडविण्याचे आमदारांचे आश्वासन

Published on

जनता दरबारात समस्या सोडवण्याचे आश्वासन
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) : येथील शाखा क्रमांक २० आणि २१ च्या वतीने आयोजित ''जनता दरबार''मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या समस्या आणि प्रलंबित कामे मांडली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सुनील प्रभू आणि अनंत (बाळा) नर यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि ते तातडीने सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
शाखाप्रमुख विजय मालुसरे आणि रवींद्र मर्ये यांनी विभागप्रमुख संतोष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर विद्या मंदिर, चारकोप येथे ''जनता दरबार'' आयोजित केला होता. पाणी, गटारे, रस्ते, स्वच्छता, पार्किंग आणि एसआरए पुनर्विकासाचे प्रलंबित प्रश्न यावर समस्या मांडण्यात आल्या. आमदारांनी काही प्रश्नांसाठी घटनास्थळावरूनच अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या. मुंबईतील ज्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार नाहीत, तेथे इतर आमदार जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, असेही सांगण्यात आले. यामुळे अनेक प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा दिलासा नागरिकांना मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com