ग्राहकांच्या खिशाला कात्री
ग्राहकांच्या खिशाला कात्री
हिवाळ्यातही भाज्यांची आवक रोडावली
वाशी, ता. १७ (बातमीदार)ः हिवाळ्यात भाज्यांची मुबलक आवक होत असल्याने दर कमी होतात, अशी वर्षानुवर्षांची धारणा आहे. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने परिस्थिती बदलेली असून राज्यभरात पिकांचे नुकसान झाल्याने थेट परिमाण भाज्यांच्या आवकवर झाला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात यंदा पावसाचा जोर दीर्घकाळ होता. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने फळ, पालेभाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे भाव वधारलेले आहेत. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांची आवक वाढते. पण यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली आहे, तर काही ठिकाणी काढणीपूर्वीच पिके खराब झाली आहेत. त्यामुळे नैसर्गिक तुटवडा असल्याने महिनाभर भाज्यांचे भाव चढेच राहण्याची शक्यता भाजीपाला व्यापारी के.डी.मोरे यांनी वर्तवली आहे.
--------------------------
प्रकार किलोचे भाव
वाटणा १००
कोबी २० ते २५
फलॉवर २५
दुधी ३५
काकडी ३०
गाजर ४०
भेंडी ६०
शिमला मिरची ४०
वांगी ३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

