कचराकुंडींची पाण्याने स्वच्छ धुलाई
कचराकुंडींची पाण्याने स्वच्छ धुलाई
परिसर स्वच्छतेसाठी पालिकेचा उपक्रम
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः शहरात दररोज निर्माण होणाऱ्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. प्रभागातील कचराकुंड्यांमध्ये साचणारा ओला-सुका कचरा, त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कचरापेट्यांची जीर्ण अवस्था आणि परिसरात पसरलेला दुर्गंधीचा त्रास यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागातील कचराकुंड्यांची आठवड्यातून एकदा पाण्याने स्वच्छ धुलाई करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कचराकुंड्यांचे स्वच्छ, आकर्षक स्वरूप राखले जाईल तसेच दुर्गंधीचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे घन कचरा विभागाचे सहाय्यक अभियंता किरणसिंग पाटील यांनी सांगितले.
पालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले की, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नियमित धुलाईमुळे कचरापेट्यांची स्थिती सुधारेल आणि परिसरातील स्वच्छतेत लक्षणीय वाढ होईल.
नियमित धुलाईमुळे रस्त्यांवरील अस्वच्छता कमी होईल. हा उपक्रम सातत्याने राबवावा हीच अपेक्षा
– हनुमंत टाव्हरे, रिक्षाचालक
कचराकुंड्या स्वच्छ ठेवल्या, तर माशा, कीटक आणि आजारांचे प्रमाणही कमी होईल. हे पाऊल आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
मनोहर जरियाल, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

