गाणे बंद केल्याने बाटलीने डोक्यावर हल्ला

गाणे बंद केल्याने बाटलीने डोक्यावर हल्ला

Published on

गाणे बंद केल्याच्या वादातून जीवघेणा हल्ला
उल्हासनगरमधील हॉटेलमध्ये बाटलीने वार
उल्हासनगर, ता. २० ः पालेगाव-नेवाळी रोडवरील जे-४९ हॉटेल येथे मध्यरात्री जेवणासाठी गेलेल्या एका नागरिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेलमधील गाणे बंद करण्याच्या एका किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादातून आरोपींनी बाटलीने हल्ला करून एका व्यक्तीला गंभीर जखमी केले. या घटनेने हॉटेल परिसरात भीतीचे वातावरण आहे, ज्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जे-४९ हॉटेल, पालेगाव-नेवाळी रोड येथे मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादी गुलशन शामदासानी हे जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. या वेळी गाणे बंद करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा हॉटेलमध्ये रोहन पालवे आणि अश्पाक सय्यद या दोघांसोबत वाद झाला. हा वाद काही वेळातच टोकाला पोहोचला. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावर थांबून न राहता आरोपींनी हॉटेलमधील दारूची बाटली फिर्यादीच्या डोक्यात फोडली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात शामदासानी यांना गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांत तक्रार दाखल
गंभीर जखमी झालेल्या गुलशन शामदासानी यांनी त्वरित पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी रोहन पालवे आणि अश्पाक सय्यद यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com