मोकाट गुरांच्या समस्येप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन
तारापूर, ता. २३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात वाढत चाललेल्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षक ऋषीकेश राकेश मालवीय यांनी केली आहे. डहाणूमध्ये निवडणूक प्रचारासाठी शनिवारी (ता. २२) आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी लेखी अर्ज दिला.
शहरात आणि ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गुरे मोकाट फिरत असतात. अनेकदा ही गुरे रस्त्यांच्या मध्यभागी तळ ठोकून बसून राहतात. त्यामुळे अचानक अपघात होतात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा मोठा परिणाम रुग्णवाहिका, शालेय बस आणि नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांवर होत आहे. अपघातांत वाहनचालक आणि गुरे दोघेही जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि काहीवेळा जीवितहानीही होत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच गोतस्करीच्या वाढलेल्या घटनांबाबतही मालवीय यांनी चिंता व्यक्त केली.
उपाययोजनांची गरज
गोरक्षक म्हणून काम करताना तस्करांशी सामना करताना अनेक अडचणी निर्माण होतात. मोकाट फिरणाऱ्या किंवा मालकांनी सोडून दिलेल्या गुरांसाठी स्वतंत्र गोशाळा उभारण्याची गरज तातडीची असून, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, गुरे रस्त्यावर बसू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

