

आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचीही तयारी
काँग्रेसची ठाम भूमिका; जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांचा संदेश
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली भूमिका अधिक ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील बदलत्या राजकीय समीकरणात काँग्रेसने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, पक्ष ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा संदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी रविवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत दिला.यावेळी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या संभाव्य युतीबाबत बोलताना पातकर यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘‘महाविकास आघाडी झाली, तर आम्हाला आनंदच आहे. युतीसाठी काँग्रेसचा हात नेहमीच पुढे असणार आहे,’’ असे ते म्हणाले. तसेच त्यांनी आघाडी न झाल्यास काँग्रेसच्या तयारीबद्दलही ठाम मत मांडले. ते म्हणाले, ‘‘जर आघाडी झाली नाही, तरी काँग्रेस मागे हटणार नाही. महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणेही मजबूत लढाई देण्यासाठी तयार आहे. शहर विकास, प्रशासनातील पारदर्शकता आणि जनहिताचे मुद्दे घेऊन आम्ही एकत्र येण्यास सकारात्मक आहोत,’’ असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.