धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सध्या वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने धूळ नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याद्वारे ठिकठिकाणी यंत्राद्वारे पाण्याची फवारणी केली जात आहे.
शहरात सुरू असलेले इमारत बांधकाम प्रकल्प, वाहतुकीची सततची वर्दळ, रस्त्याची कामे, खोदकाम आणि कोरडे वातावरण यामुळे निर्माण होणाऱ्या धूलिकणांमुळे परिसरातील हवा दूषित होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या आसपास पोहोचला आहे, जो १०० च्या खाली असणे आवश्यक आहे. याआधी महापालिकेने इमारत बांधकाम प्रकल्पांना धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात नोटिसा जारी केल्या आहेत. त्यापाठोपाठ शहरातील विविध गर्दीच्या भागात धूळ नियंत्रण यंत्रद्वारे पाण्याची फवारणी सुरू केली आहे.
शहरातील प्रमुख मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फाउंटन, तसेच गायमुख परिसरात, तसेच प्रभाग समिती क्रमांक ३, ४, ५ आणि ६ च्या मध्ये यंत्राद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली. याव्यतिरिक्त विविध प्रभागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि प्रदूषणप्रवण परिसरांमध्येदेखील फवारणी करून धूलिकणांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, आगामी काळातही शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची फवारणी, स्वच्छता मोहिमा आणि धूलिकण नियंत्रण उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

