

अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : एका बाजूला नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे अंबरनाथचे राजकीय वातावरण तापले आहे, तर दुसऱ्या बाजूला पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकही आता पेटून उठले आहेत. अपुरा पाणीपुरवठा, कमी दाब आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी ५ डिसेंबरला मजीप्रा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील फातिमा चर्च परिसर, फातिमा कॉलनी, साऊथ इंडियन स्कूलजवळील भाग, काव्या, लंबोदर, डॉली व्हिला, ओमा साई सलोम अपार्टमेंट आणि आसपासच्या प्रभागांत एक दिवसाआड आणि अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुभाषवाडी आणि वांद्रापाडा भागात तर रात्री १०.३० वाजल्यानंतरच पाणी येते. या संदर्भात शिवसेनेचे विकास हेमराज सोमेश्वर यांनी मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यास निवेदन देत दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा दिला आहे. तक्रारींना अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आता सर्वजण आंदोलनासाठी सज्ज आहेत.
अंबरनाथमध्ये निवडणुकीची तापलेली हवा आणि त्यातच पाण्याच्या प्रश्नावर निर्माण झालेला जनक्षोभ या दोन्हींचा परिणाम प्रशासनावर मोठ्या दबावाच्या रूपात होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शहरवासीयांच्या या गंभीर समस्येवर मजीप्राने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखाने मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.