योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन हेच केळी उत्पादनाचे सूत्र

योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन हेच केळी उत्पादनाचे सूत्र

Published on

वाणगाव, ता. ४ (बातमीदार) : केळी पीक हे अत्यंत खादाड असल्याने योग्य खत व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा राखणे हेच अधिक उत्पादनाचे सूत्र आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी संशोधन केंद्राचे पीक संरक्षणतज्ज्ञ डॉ. अंकुर ढाणे यांनी केळी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात केले आहे.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील नरेशवाडी येथील गिरी वनवासी प्रगती मंडळाच्या फार्मवर केळी लागवड, कीड-रोग व्यवस्थापन, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानावरील सर्वसमावेशक शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. मंडळाच्या पुढाकाराने आणि नरेशवाडी फार्मवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना आधुनिक केळी शेतीचे तंत्रज्ञान समजून घेण्याची मौल्यवान संधी मिळाली. या कार्यक्रमाचे नियोजन नरेशवाडी फार्मचे कृषी व्यवस्थापक ऋषिकेश खिलारी यांनी केले. फार्मचे महाव्यवस्थापक अनिकेत माऊलीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत गिरीवनवासी प्रगती मंडळाची उद्दिष्टे, विविध चालू उपक्रम, शेती-शिक्षण क्षेत्रातील प्रगती आणि आदिवासी भागात प्रगतीसाठी संस्थेने हाती घेतलेले उपक्रमांची माहिती दिली. नेटफिम कंपनीचे कृषीतज्ज्ञ सागर खोडके यांनी केळी पिकासाठी जमीन पूर्वतयारी, ड्रीपद्वारे खत व पाणी देण्याची पद्धत आणि रोप निवडीचे महत्त्व समजावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com