पालिकेने लटकवलेल्या शिवशाहीच्या घरांची सरकारकडून दखल

पालिकेने लटकवलेल्या शिवशाहीच्या घरांची सरकारकडून दखल

Published on

पालिकेकडील घरांची
माहिती मागवली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेने ‘शिवशाही प्रकल्पा’ची घरे आपत्कालीन परिस्थितीसाठी अडकवून ठेवली आहेत. त्या घरांचे भाडेही दिले जात नाही. याची दखल राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने घेतली आहे. त्याबाबतची माहिती आणि किती भाडे थकीत आहे, याची माहिती ‘शिवशाही’ने मागवली आहे. पालिकेकडेही त्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे शिवशाहीची ५८७ घरे परत मिळू शकतील किंवा त्याचे भाडे मिळू शकेल, अशी चिन्हे आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत बेघर झालेल्यांना तत्काळ घर देता यावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिकेने घरांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. पालिकेने तसे न करता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची तब्बल ५८७ घरे आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे ती घरे राखीव ठेवावी लागली आहेत. त्याबदल्यात पालिकेकडून शिवशाहीला भाडे, अनामत रक्कम दिली जात नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची बाब उघड झाली होती. त्याची राज्य सरकारने दखल घेऊन शिवशाही आणि पालिकेकडून या प्रकरणाची माहिती मागवल्याचे ‘शिवशाही’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com